Marathi Story for Kids एका नगरात विक्रमसिंग नावाचा राजा होता. तो फार जुलमी राजा होता. प्रजा त्याच्या अत्याचाराला कटाळून नगर सोडून दुसऱ्या राज्यात जाऊ लागली होती. त्याचा प्रधान चतुर आणि फार प्रामाणिक होता. पण तो राजाला त्याच्या वागण्याबद्दल काही सांगू शकत नव्हता. एकदा प्रधान रानात गेला, तेव्हा त्याला तिथे एक गोसावी जप करीत बसलेला दिसला. त्याने गोसावीला नमस्कार केला, गोसाव्याने विचारलं कोण तुम्ही प्रधानाने स्वत:ची ओळख दिली. Marathi Story for Kids त्यावर गोसावी म्हणाला, त्या जुलमी राजाला ताळ्यावर आणणे हे तुमचं कर्तव्य आहे. राजाला त्यांची चूक लक्षात आणून देण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा. प्रधान म्हणाला महाराज पण कसं सागायच राजाला, तुम्हाला काही उपाय सूचत असेल तर सांगा? चतुर प्रधानाच्या डोक्यात एक कल्पना आली त्याने त्या साधूच्या कानात सांगितली. गोसाव्याने त्याप्रमाणे वागण्याचे वचन दिले. दसऱ्यादिवशी विक्रमसिंग राजचा दरबार भरला होता, तेवढ्यात एक सेवक आत आला आणि म्हणाला, महाराज पक्ष्याची भाषा जाणणारा एक साधू आला आहे, महाजांनी त्याला आत यायला सांगितले. राजा प्...
Marathi Story for Kids Marathi Story for Kids हि बगदाद शहरातील खूप जुनी गोष्ट आहे. हारून रशीद नावाचा प्रसिद्ध बादशाह हॊता. एकदा काही कारणा वरून तो आपल्या वाजीरावर नाराज झाला. त्याने वजिराला व त्याच्या मुलाला तुरंगात टाकले. वजिराला एक आजार होता, त्याला थंड पाण्याने त्रास होत असे. त्याला सकाळी अंघोळ करण्यासाठी नेहमी गरम पाणी लागत असे. पण तुरंगात अशी सोय नव्हती. तिथल्या कैद्यांना ना थंड पाणीच दिले जात असे. फाजलला आपल्या वडिलांचा त्रास माहित होता, त्याने आपल्या वडिलांना गरम पाणी देण्यासाठी एक कल्पना केली. Marathi Story for Kids तो रोज संध्याकाळी एका भांड्या मध्ये पाणी भरून कंदिलावर ठेवत असे . रात्रभर कंदिलाच्या उष्णतेने पाणी कोमट होत असे . त्याच पाण्याने त्याचे अब्बू सकाळी हात-तोंड धूत असत. पण त्या तुरुंगाचा जेलर खूपच निर्दयी होता. जेव्हा त्याने पाहिले की, फजल आपल्या वडिलांसाठी कंदिलावर पाणी गरम करतो तेव्हा त्याने रागाने कंदिलच तिथून काढून टाकले. फजलच्या वडिलांवर पु...