Skip to main content

Marathi Story for Kids

Marathi Story for Kids

एका नगरात विक्रमसिंग नावाचा राजा होता.

तो फार जुलमी राजा होता.

प्रजा त्याच्या अत्याचाराला कटाळून नगर सोडून दुसऱ्या राज्यात जाऊ लागली होती.

त्याचा प्रधान चतुर आणि फार प्रामाणिक होता.

पण तो राजाला त्याच्या वागण्याबद्दल काही सांगू शकत नव्हता.

एकदा प्रधान रानात गेला, तेव्हा त्याला तिथे एक गोसावी जप करीत बसलेला दिसला.

त्याने गोसावीला नमस्कार केला, गोसाव्याने विचारलं कोण तुम्ही प्रधानाने स्वत:ची ओळख दिली.

Marathi Story for Kids

त्यावर गोसावी म्हणाला, त्या जुलमी राजाला ताळ्यावर आणणे हे तुमचं कर्तव्य आहे.

राजाला त्यांची चूक लक्षात आणून देण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा.
प्रधान म्हणाला महाराज पण कसं सागायच राजाला, तुम्हाला काही उपाय सूचत असेल तर सांगा?

चतुर प्रधानाच्या डोक्यात एक कल्पना आली त्याने त्या साधूच्या कानात सांगितली.

गोसाव्याने त्याप्रमाणे वागण्याचे वचन दिले.

दसऱ्यादिवशी विक्रमसिंग राजचा दरबार भरला होता, तेवढ्यात एक सेवक आत आला आणि म्हणाला, महाराज पक्ष्याची भाषा जाणणारा एक साधू आला आहे,

महाजांनी त्याला आत यायला सांगितले. राजा प्रधानाला म्हणाला, प्रधानजी आज संध्याकाळी जगलात फिरायला जाताना या गोसावीबुवांना सोबत घेऊन जाऊ.

Marathi Story for Kids

संध्याकाळी ते तिघेही नगराच्या बाहेर पडत असताना वाटेत झाडावर बसलेले दोन पक्षी आपआपसात काहीतरी कुजबुज करीत असलेले राजाला दिसले.

राजा त्याकडे बोट दाखवून म्हणाला, गोसावीबुवा हे पक्षी काय बोलताहेत?

गोसावी म्हणाला, पण महाराज ते मी तुम्हाला. सांगितलं तर तुम्ही मला मारून टाकाल.
राजाने तसे होणार नाही असे वचन दिले.

गोसावी म्हणाला, महाराजा जो डाव्या बाजुला बसला आहे त्याची मुलगी लग्नाची आहे.
उजव्या बाजुला बसलेला पक्षी हा परराज्यातून आला आहे.

त्याने आपली मुलगी या परराज्याच्या पक्ष्याच्या मुलाला देण्याची गोष्ट त्याच्याकडे काढली .

त्यावर वर पिता असलेला पक्षी म्हणतो, मुली बरोबर आंदण म्हणून शभर गाव देण्याची तुझी तयारी आहे का?

Marathi Story for Kids

राजा म्हणाला मग, तो पक्षी काय म्हणतो?

गोसावी म्हणाला, तो म्हणतो अहो शंभर गावांचं काय घेऊन बसलात, इथल्या राजाचा जुलुम जर असाच चालू राहिला तर सर्व प्रजा हे राज्य-सोडून परराज्यात जातील मग सर्वच गावे रिकामे होतील.

मग ही पाचशेच्या पाचशे गाव जावयाला देईन.

Marathi Story for Kids

हे ऐकून राजाची मान शरमेने खाली गेली.

त्या दिवसानंतर त्याच्या वागण्यात फरक पडू लागला.

तो एक चांगला राजा झाला.
शिकवण : कोणी फार चुकीचे वागत असेल तर त्याला समजेल अशा भाषेत त्याची चूक लक्षात आणून देणे आवश्यक असते. चूक लक्षात आल्यावर त्या व्यक्तीच्या वागण्यात फरक पडू शकतो.

Marathi Story for Kids

Comments

Popular posts from this blog

पिता के लिए बेटे का त्याग | Moral Story

Marathi Kid's Story

Marathi Kid's Story महानतेचे व परोपकाराचे लक्षण बोधकथा एक मुलगा रोज शाळेत शिकण्यासाठी जात असे . घरी त्याची आई होती , आईचे आपल्या या मुलावर जिवापाड प्रेम होते .  तिला त्याचा प्रत्येक हट्ट पुरवण्यात आनंद वाटे .  मुलगाही अभ्यासात हुशार व कष्टाळू होता.  एकदा त्यांच्या दारापुढे उभे राहून कोणीतरी ' माय , ओ माय ' असा आवाज दिला.  आवाज ऐकून मुलाने दार उघडले .  Marathi Kid's Story बाहेर त्याला एक फाटक्या कपड्यातील कृश म्हातारी थरथरते हात पसरवून उभी असलेली दिसली.  ती म्हणाली , ' लेकरा , थोडी भीक दे रे. ' म्हातारीच्या तोंडचे ते दीनवाणे शब्द ऐकून मुलगा भावुक झाला आणि घरात जाऊन आईला म्हणाला , ' आई , एक गरीब बिचारी म्हातारी काही मागत आहे .  त्यावेळी घरात काहीच खाद्य पदार्थ शिल्लक नव्हता.  Marathi Kid's Story आई म्हणाली , ' बाळा , आत्ता खायला देण्यासारखे काहीच शिल्लक नाही. हवे तर तांदूळ दे.' पण मुलगा हट्ट करीत म्हणाला , ' आई , तांदळाने काय होणार आहे ? तू हातात जे सोन्याचे कंगन आहे ना तेच दे त्या बिचारीला.  म...