Marathi Story for Kids
Marathi Story for Kids
हि बगदाद शहरातील खूप जुनी गोष्ट आहे.
हारून रशीद नावाचा प्रसिद्ध बादशाह हॊता.
एकदा काही कारणा वरून तो आपल्या वाजीरावर नाराज झाला.
त्याने वजिराला व त्याच्या मुलाला तुरंगात टाकले.
वजिराला एक आजार होता, त्याला थंड पाण्याने त्रास होत असे.
त्याला सकाळी अंघोळ करण्यासाठी नेहमी गरम पाणी लागत असे.
पण तुरंगात अशी सोय नव्हती.
तिथल्या कैद्यांना ना थंड पाणीच दिले जात असे.
फाजलला आपल्या वडिलांचा त्रास माहित होता, त्याने आपल्या वडिलांना गरम पाणी देण्यासाठी एक कल्पना केली.
Marathi Story for Kids
तो रोज संध्याकाळी एका भांड्या मध्ये पाणी भरून कंदिलावर ठेवत असे .
रात्रभर कंदिलाच्या उष्णतेने पाणी कोमट होत असे .
त्याच पाण्याने त्याचे अब्बू सकाळी हात-तोंड धूत असत.
पण त्या तुरुंगाचा जेलर खूपच निर्दयी होता.
जेव्हा त्याने पाहिले की, फजल आपल्या वडिलांसाठी कंदिलावर पाणी गरम करतो तेव्हा त्याने रागाने कंदिलच तिथून काढून टाकले.
फजलच्या वडिलांवर पुन्हा थंड पाण्यानेच हात-तोंड धुण्याची पाळी आली.
त्यामुळे त्यांचा आजार वाढला.
Marathi Story for Kids
फजलला आपल्या वडिलांचा त्रास पाहवला नाही.
त्याने आणखी एक उपाय केला.
संध्याकाळी तो लोट्यात पाणी भरून आपल्या पोटाजवळ धरून ठेवत असे.
रात्रभर त्याच्या शरीराच्या उष्णतेने पाणी थोडेफार गरम होत असे.
त्याच पाण्याने त्याचे अब्बू सकाळी हात-तोंड धूत.
पण रात्रभर पाण्याने भरलेला लोटा पोटाजवळ धरून ठेवल्यामुळे फजल झोपू शकत नव्हता.
कारण झोपेत लोटा पडण्याची त्याला भीती वाटत असे.
अशाप्रकारे त्याने अनेक रात्री घालवल्या.
त्यामुळे तो अशक्त झाला;
Marathi Story for Kids
पण त्याने एक शब्दही काढला नाही.
शेवटी जेलरला फजलच्या या पितृभक्तीविषयी समजले तेव्हा त्याचे मनही विरघळले.
त्याने फजलच्या अब्बूसाठी तुरुंगात गरम पाण्याची व्यवस्था केली.
ही गोष्ट बादशहाच्या कानावर गेली.
तो ही वडिलांसाठीच्या फजलच्या त्यागभावनेने प्रभावित झाला.
शेवटी त्याने दोघांनाही सोडून देण्याचा आदेश दिला.
Moral : आपल्या वडिलांसाठी आपल्या मनात तीच त्याग व समर्पणाची भावना हवी जशी त्यांची आपल्यासाठी असते .
Comments
Post a Comment